पुणे, ता. १६ : “शिक्षणाने भविष्य घडू शकते; मात्र, त्यासाठी योग्य वेळी, योग्य संधी मिळायला हवी. शिक्षणाला नवतंत्रज्ञान, कौशल्य, उद्यमशीलता आणि जिद्दीची जोड मिळाली, तर विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल घडेल,” असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. तसेच, ग्रामीण भारताच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत […]
