विद्यार्थी साहाय्यक समिती, ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनात घडविणारी संस्था आणि युवा परिवर्तनाचे केंद्र म्हणून विद्यार्थी साहाय्यक समितीच्या कामाकडे पाहिले जाते. समिती ही धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ५० ए (३) अंतर्गत नोंदणीकृत (क्र. ई-२१९, पुणे) संस्था असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारतभर आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल परंतु गुणवत्तेच्या जोरावर काहीतरी ध्येय ठेवून धडपड करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना पुण्यात अतिशय माफक दरात राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी या हेतूने ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. अच्युतराव आपटे, स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ फाटक, सुमित्राताई केरकर आदींनी १९५५ मध्ये या कामाला सुरवात केली. समिती म्हणजे केवळ लॉजिंग बोर्डिंग नाही तर येथे माफक दरात निवास, भोजन व्यवस्थेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व असते. स्वच्छता, समता आणि श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर समितीचे काम चालते.
![खोली](http://58y.e0c.myftpupload.com/wp-content/uploads/2021/08/rooom-1024x486.jpg)
![भोजनालय](http://58y.e0c.myftpupload.com/wp-content/uploads/2021/08/restaurant-1024x505.jpg)
![ग्रंथालय](https://samiti.org/mr/wp-content/uploads/2024/05/library.jpg)
![संगणक](https://samiti.org/mr/wp-content/uploads/2024/05/Computer-lab.jpg)
![आरोग्य केंद्र](http://58y.e0c.myftpupload.com/wp-content/uploads/2021/08/aarogya-1024x488.jpg)
![](http://58y.e0c.myftpupload.com/wp-content/uploads/2021/08/gallery-Sports-and-recreation-300x150.jpg)